प्रायव्हेट कंपन्यांनी वाढवलेल्या दरामुळे BSNL चर्चेत आहे. तर BSNL बद्दल संपूर्ण माहिती जाणून घेऊया

 प्रायव्हेट कंपन्यांनी वाढवलेल्या दरामुळे BSNL चर्चेत आहे. तर BSNL बद्दल संपूर्ण माहिती जाणून घेऊया.

त्यासाठी शेवट पर्यंत वाचा.

BSNL Case Study


BSNL ची सुरूवात कशी झाली :

BSNL म्हणजे भारत संचार निगम लिमिटेड याची सुरूवात ऑक्टोबर 2000 मध्ये झाली. याचा मुख्य उद्देश एवढाच होता भारतातील प्रत्येक सामान्य माणसांमध्ये संवाद घडवण्याचं एक माध्यम. कंपनीने सुरुवातीपासूनच सर्वसामान्य लोकांना परवडेल असे प्लॅन्स केलेले होते.

BSNL हे सरकारी कंपनी असल्यामुळे ग्रामीण भागातील लोकांना सुद्धा चांगल्या प्रकारचं नेटवर्क मिळावं यासाठी BSNL नेहमीच प्रयत्न करतं असतं.

प्रायव्हेट क्षेत्रात देखील इतर अनेक कंपन्या होत्या परंतु BSNL ने लोकांमध्ये विश्वास निर्माण केला होता त्यामुळे 2001 ते 2008 पर्यंत BSNL चांगला नफा करत होता. एकदाही त्यांना तोटा सहन करावा लागणार नाही.

तब्बल 46,668 हजार रुपयांचा नफा बीएसएनएलने केला.

टेलिकम्युनिकेशन इंडस्ट्री मध्ये तब्बल 70 टक्के भाग बीएसएनएल सांभाळत होता. 

BSNL 5G Planning -

BSNL 5G Planning



BSNL चा डाऊन फॉल कसा सुरु झाला : 

हिंदीमध्ये एक म्हण आहे, लालच बुरी बला है. या म्हणीप्रमाणे तेव्हाच्या गटबंधन सरकारमधील टेली कम्युनिकेशन मिनिस्टर Dayanidhi Maran यांनी त्यांच्या घरी बीएसएनएलच्या मोठ्या अधिकाऱ्यांच्या मार्फत 323 हाय कनेक्शन लाईनच्या मार्फत त्यांच्या SUN TV Network या मीडिया चॅनलला इंटरनेट सप्लाय करत होते.

सीबीआयच्या चौकशीनंतर हे सत्य उघडकीस आले. त्यामुळे यांना राजीनामा द्यावा लागला.

 पुढे त्यांच्याच पक्षाचे A. Raja मिनिस्टर झाले. त्यांच्या कार्यकाळात 2G मोठे मोठे प्रकल्प करण्यासाठी टेंडर दिले होते परंतु नंतर त्यामागे 1.76 लाख करोड रुपयांचा घोटाळा प्रकरण चालू झाले.

एवढ्या मोठ्या घोटाळ्याच्या आरोपामुळे तेव्हापासून बीएसएनएल ची उलटी गिनती चालू झाली. आजपर्यंत बीएसएनएल ला तोटा होत गेला. 

त्यानंतर A.Raja यांना सुप्रीम कोर्टाकडून दिलासा देण्यात आला. त्यामुळे हा घोटाळा होता का नाही याची कोणत्याही प्रकारची सत्यता समोर आली नाही.

परंतु बीएसएनएल वरचा विश्वास ग्राहकांच्या मनामधून उतरून गेला. फक्त सीबीआयएस नव्हे तर संपूर्ण देशाचे लक्ष बीएसएनएल कडे वळले.

सीबीआयच्या चौकशीमध्ये फक्त मोठ्याच नव्हे तर लहान लहान टेंडर मध्ये सुद्धा घोटाळे उघडकीस आले. त्यामुळे बीएसएनएल वरची विश्वासार्हता लोकांच्या मनातून निघून गेली.

या काळामध्ये प्रायव्हेट कंपन्या जसे आयडिया, वोडाफोन, एअरटेल या कंपनीने जोरदार प्रयत्न केले आणि मार्केट वरती ग्राहक संख्या वाढवण्याचे वेगवेगळे प्रयत्न चालू केले. मोठ्या प्रमाणात त्यांचे टॉवर उभारणीचे प्रकल्प हाती घेतले.

बीएसएनएल वर वाढत्या चौकशी त्यामुळे त्यांना या गोष्टीकडे लक्ष देण्यासाठी वेळच नव्हता. नवीन प्रकल्प हाती घेण्याचे तर सोडाच परंतु जे आहे ते सुद्धा सांभाळता आले नाही.

सरकारी कंपनी असल्यामुळे तेथील कर्मचाऱ्यांच्या वागणुकीमध्ये खूप फरक दिसून येत असायचा. ग्राहकांना उद्धट बोलणे, त्यांच्या समस्यांचे निराकारण न करणे, कामाची टाळाटाळ करणे यामुळे देखील बीएसएनएल ला मोठ्या प्रमाणात तोटा सहन करावा लागला.

Jio ची भव्य सुरुवात :

2016 मध्ये रिलायन्स  इंडस्ट्रीज लिमिटेड चे अध्यक्ष मुकेश भाई अंबानी यांनी जिओ ची घोषणा केली. सुरुवातीला जिओ ने फ्री मध्ये इंटरनेट ही संकल्पना मांडल्यामुळे सर्वच टेलिकम्युनिकेशन इंडस्ट्री मधील कंपन्यांना मोठ्या प्रमाणात धक्का बसला.

त्यामुळे अनेक कंपन्यांच्या ग्राहक Jio कडे वळले.

जिओ मध्ये डायरेक्ट 4G कनेक्शन आणि तेही अगदी मोफत मिळत असल्यामुळे सर्व ग्राहक संख्या जीवाकडे आकर्षित झाली.

Recharge Plans 


Recharge Plan


∆ आता बीएसएनएलची एवढी चर्चा कशामुळे होत आहे ?

तर प्रायव्हेट क्षेत्रातील कंपन्यांनी त्यांच्या रिचार्ज प्लान चे दर वाढवल्यामुळे सर्वत्र #PortBSNL हे हॅशटॅग चर्चेत आहे.

प्रायव्हेट कंपन्यांची मनमानी चालू नये त्यामुळे लोकांमध्ये खास करून सोशल मीडिया माध्यमांमध्ये या गोष्टीची चर्चा सुरू आहे. कारण बीएसएनएल सारख्या सरकारी कंपन्या टिकल्या तरच प्रायव्हेट कंपन्या वरती सरकारचा थोडाफार नियंत्रण राहील.

प्रत्यक्ष क्षेत्रामध्ये फक्त एक दोन कंपन्या असतील तर ते सर्वांसाठी धोकादायक ठरू शकते त्यामुळे स्पर्धाही पाहिजेच. 

बीएसएनएल सारेचार्ज शे दर इतर कंपन्यांच्या तुलनेत फार कमी असल्यामुळे ही अनेक जण बीएसएनएल कडे जाण्याचा तयारीत आहेत. 

BSNL पुन्हा रिस्टार्ट करेल का ? 

केंद्रात असलेल्या मोदी सरकारने BSNL ला चांगल्या प्रकारे मदत करण्याचे ठरवले आहे. 89,047 करोड रुपयांचा निधी सरकार द्वारे कॅबिनेट मीटिंगमध्ये मंजूर झाला.

त्यामुळे बीएसएनएल ला येणाऱ्या भविष्यकाळामध्ये चांगले दिवस येतील अशी अशा सर्वांनाच आहे. 

#_BSNL Is Back


BSNL मध्ये TATA एन्ट्री :

BSNL ने 4G कनेक्शन च्या टॉवर उभारण्याचे प्रकल्प रतन टाटा यांची कंपनी असलेल्या टाटा कन्सल्टन्सी सर्विसेस 15000 करोड रुपयांचे टेंडर दिले आहे. आणि लवकरच 2025 पर्यंत सर्व ठिकाणी 5G सुविधा देण्याचे प्रकल्प यामध्ये समाविष्ट आहेत.

त्यामुळे सध्या बीएसएनएलची मोठ्या प्रमाणात चर्चा आहे.

बीएसएनएल ने केलेली नवीन सुरुवात ग्राहकांच्या पसंतीस येईल ?  हा मोठा प्रश्न निर्माण होण्यासारखा आहे. 

यातून एक गोष्ट लक्षात येते की, स्वतःमध्ये बदल करावे लागते. नाहीतर मागून येऊन लोक आपल्यापुढे जातील. आणि आपल्याला कळणारही नाही.

अशाच प्रकारच्या आणखी पोस्ट वाचण्यासाठी आमच्या चॅनलला फॉलो करा.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

लाडकी बहीण योजना सरकारने तुर्तास थांबवली! काय आहे कारण ? जाणून घ्या

लाडकी बहीण नंतर राज्य सरकार आता लाडका शेतकरी योजना राबवणार

आता ज्येष्ठ नागरिकांना मिळणार दरमहा 3 हजार रुपये मुख्यमंत्री वयोश्री योजना..!!