सरपंच व उपसरपंच यांच्या मानधनात वाढ! किती मिळते सरपंच आणि उपसरपंच यांना मानधन, जाणून घ्या ?
सरपंच व उपसरपंच यांच्या मानधनात वाढ! किती मिळते सरपंच आणि उपसरपंच यांना मानधन, जाणून घ्या ? -
Sarpanch Salary Hike : सरपंच व उपसरपंच यांचा पगार गावातील लोकसंख्येनुसार ठरतो. सरपंच व उपसरपंच यांच्या मानधनात दुप्पट वाढ करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.
![]() |
सरपंच उपसरपंच यांच्या मानधनात दुप्पट वाढ |
Sarpanch Salary Hike: कोणत्याही गावाच्या ग्रामपंचायतीचा प्रमुख सरपंच असतो. गावातील ग्रामपंचायतीचा सर्व कारभार सरपंचाच्या हाती असतो. सरपंचाला ग्रामपंचायतीचे काम व जबाबदाऱ्या पार पडण्यासाठी ग्रामसेवक मदत करतात. नुकताच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. सरपंच आणि उपसरपंचांच्या मानधनांमध्ये वाढ करण्यात आली आहे.
मुख्यमंत्र्यांनी सोमवारी (23 सप्टेंबरला) एक्स वर एक पोस्ट घेतली. त्यामध्ये मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेतलेल्या निर्णयांची यादी होती. या यादीतील एक महत्त्वाचे निर्णय हा राज्यातील सरपंच आणि उपसरपंचाचे मानधन दुप्पट करण्याबाबतचा होता. या निर्णयाच्या निमित्ताने सरपंच व उपसरपंच यांना किती मानधन मिळते, ते जाणून घेऊयात.
राज्यातील सरपंच व उपसरपंच यांच्या मानधनात दुप्पट वाढ करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. त्यानुसार आता ज्या ग्रामपंचायतींची लोकसंख्या 2000 आहे, त्या ग्रामपंचायतीचे सरपंचांना मानधन 3000 वरून 6000 रुपये करण्यात आले आहेत. तसेच उपसरपंच यांचे मानधन 1000 रुपये होते ते आता दुप्पट करण्याचा निर्णय घेतला आहे.
2000 ते 8 हजारांच्या दरम्यान लोकसंख्येने असलेला ग्रामपंचायतच्या सरपंचांच मानधन चार हजार रुपये होतं ते आता आठ हजार रुपये करण्यात आला आहे. तर येथील उपसरपंचाच मानधन पण राशी 1500 रुपयां-वरून 3000 करण्यात आला आहे. याबरोबरच ज्या ग्रामपंचायतींची लोकसंख्या 8000 पेक्षा जास्त आहे, तेथील सरपंचांच मानधन 5000 वरून 10 हजारापर्यंत करण्यात आले आहे आणि उपसरपंचांचे मानधन 2000 वरून आता 4 हजार करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.
सरपंचाची काम व जबाबदाऱ्या -
ग्रामपंचायतच्या सभा बोलवणे व अध्यक्ष म्हणून सभेचे कामकाज पार पाडणे.
ग्रामसभा बोलविणे व त्याचे अध्यक्षपद भूषविणे. सभेमध्ये पारित केलेल्या ठरावांची अंमलबजावणी करणे.
ग्रामपंचायतीच्या मालकीची मालमत्ता सुरक्षित असल्याची खात्री करणे.
जमा खर्च विवरणपत्र व अंदाजपत्रक तयार करण्याची व्यवस्था करणे.
महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियमांचे कलम 49 नुसार स्थापन करण्यात येणाऱ्या ग्रामविकास समित्यांचे पदसिद्ध अध्यक्ष पद भूषविणे.
ग्रामपंचायतचे वार्षिक अंदाजपत्रक तयार करणे व ते मासिक सभा आणि ग्रामसभेपुढे मान्यतेसाठी सादर करणे.
गावचा विकास आराखडा तयार करणे.
ग्रामसभा व ग्रामपंचायतच्या मदतीने सर्व योजनांची अमलबजावणी करणे.
शासकीय योजनांचा लाभ वंचित घटक, निराधार, विधवा, परित्यक्ता, अपंग व्यक्तींना मिळवून देणे.
महाराष्ट्र ग्रामपंचायत लेखा संहिता 2011 नुसार आर्थिक व्यवहार करणे व त्यावर नियंत्रण ठेवणे.
महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियमातील कलम 45 मधील ग्रामसूचीनुसार सर्व कामे करण्याची जबाबदारी सरपंचांची आहे.
सरपंचांनी आपली कर्तव्य नीट पार पाडली नाही तर त्याला पदावरून दूर करता येईल.
ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचे व सदस्यांचे प्रवास भत्ता व देयके मंजूर करण्याचे अधिकार सरपंचास आहेत. (मी सरपंच या पुस्तकाची माहिती देण्यात आली आहे).
महाराष्ट्र वसंतराव नाईक समितीच्या शिफारसीनुसार 1 मे 1962 पासून ग्रामपंचायत, पंचायत समिती व जिल्हा परिषद आशी त्रिस्तरीय पंचायत राज व्यवस्था सुरू झाली. त्याअंतर्गत गावातील प्रशासकीय अधिकार सरपंचांकडे आले. सरपंचांचा कार्यकाळ पाच वर्षाचा असतो, पण गैरवर्तवणुकीच्या कारणावरून त्याला पदावरून हटवता येऊ शकतात.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा